1921 साली जेव्हा गांधीजींनी असहयोग आंदोलन सुरू केले तेव्हा भगतसिंग त्या आंदोलनात सामील झाले. परंतु चौरीचौरा येथील घटनेने व्यथित होऊन गांधीजींनी आपले आंदोलन थांबवले. हे सर्व पाहून भगतसिंग निराश झाले. त्यांनी विचार केला की अहिंसेच्या मार्गाने स्वतंत्र मिळवणे कठीण आहे, म्हणून त्यांनी सशस्त्र क्रांतीने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा निश्चय केला.
सायमन कमिशनच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी भगतसिंग व चंद्रशेखर आजाद यांनी पोलिस अधिकारी सौंडर्स ची गोळी मारून हत्या केली. या घटनेनंतर इंग्रजांनी त्यांना पकडण्यासाठी आपली संपूर्ण शक्ती लावली. परंतु भगतसिंग व चंद्रशेखर आजाद दोघी शिक्षेपासून वाचण्यासाठी रूप पालटून हावडा येथे गेले.
याच्या काही काळानंतर इंग्रजांना भारतीयांची शक्ती दाखवून देशवासीयांना जागृत करण्यासाठी त्यांनी विधानसभेत बॉम्ब टाकण्याचा निर्णय घेतला ठरलेल्या योजनेनुसार ते आपले सहकारी बटुकेश्वर दत्त यांच्यासोबत विधान सभेच्या सत्रात पोहोचले व त्यांनी बॉम्ब फेकला. या हल्यात कोणीही ठार होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. बॉम्ब फुटल्यानंतर त्यांनी इंकलाब झिंदाबाद चे नारे दिले. यानंतर त्यांनी स्वताला पोलिसांच्या ताब्यात दिले. इंग्रजांनी त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली. परंतु जेव्हा इंग्रजांना कळाले की भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांनीच पोलिस अधिकारी सौंडर्स ची हत्या केली तेव्हा त्यांनी तिघांना फाशीची शिक्षा सुनावली.
23 मार्च 1931 ला आपल्या फाशीच्या दिवशी हे तिघी वीर इंकलाब झिंदाबाद, भारत माता की जय हे नारे देत जात होते. सरदार भगत सिंग हे देशाच्या महान क्रांतिकारी नेत्यांपैकी एक होते. देशाच्या स्वातंत्र्यात त्यांनी दिलेले बलिदान खरोखर प्रशंसनीय आहे. आज जरी भगत सिंग आपल्या सोबत नाही आहेत, तरी त्यांची देशभक्ती ची भावना आणि बलिदान सर्वांना प्रेरणा देत असते.
No comments:
Post a Comment