ओलांडोनी❎ येत माप मी
केले नाही मोजमाप मी
ओलांडून✅
सर्वांमध्ये गुंतता अशी
विसरते मला कशी साफ मी
लगावली✅
पण उला पूर्ण वाक्य नसल्याने उला-सानी एक वाक्य वाटत आहे.. ते तसे नसावे.
चुका खोडल्या उदार झाले
केले गफले❎ सलग माफ मी
शक्यतो मराठी शब्द वापरावा..
केले सलग माफ मी.. असे आपण म्हणत.. सलग हा शब्द अनावश्यक वाटतो.
करते विचार मंगल दायक
का द्यावा मग, कुणा❎ शाप मी
कुणास✅ कुणाला✅
कांचन श्रीकृष्ण नेवे
चिंचवड
वरील रचनेत वरून आपणास कळते की;
१. उला आणि सानी हे दोन मिसरे स्वतंत्र आणि पूर्ण वाक्ये असावीत...
२. प्रमाण शब्द वापरावेत. (ओलांडोनी ❎ ओलांडून✅)
३. शक्यतो मराठी शब्दच वापरावेत.
४. व्याकरण शुद्ध असावे.
शिकत असताना नेहमी वरील नियम पाळावेत...
गजल आणि कवितेत हे मुलभूत फरक आहेत.. गजल ही शक्यतो जास्तीत जास्त प्रमाणित आणि शुद्ध असावी तर कवितेत आपण मीटर आणि लय येण्यासाठी शब्दांची मोडतोड किंवा व्याकरणाकडे दुर्लक्ष करू शकतो. अशा कविता सुद्धा अप्रतिम ठरतात. (अर्थात कवितेत सुद्धा शक्यतो हे नियम पाळायचा प्रयत्न करावा)
आता आपण काफिया पाहू..
वरील रचनेत (तूर्तास शेर नको म्हणूयात)
काफिये हे स्वर काफिये आहेत..
काफिया स्वर काफिया आहे की नाही हे समजण्यासाठी आधी अलामत काय हे समजून घेतले पाहिजे..
गजलमधे... तीन गोष्टींना अनन्य साधारण महत्व आहे...
अलामत, काफिया, रदिफ..
रदिफ... मिस-यामधे एक शब्द किंवा शब्द समूह समान..
काफिया... शब्द आणि त्या शब्दात मधील एक किंवा काही अक्षरे समान)
अलामत.. अक्षराचा स्वर अंत (स्वरांत)
वरील उदाहरणात..
रदिफ.....
सानी मिस-याचा शेवट मी ह्या शब्दाने केला असल्याने. मी हा एक शब्द रदिफ ठरतो.
काफिया...
दोन प्रकारचे असतात.
१ शुद्ध काफिया
२. स्वर काफिया..
*शुद्ध काफिया*
अशाप्रकारच्या काफिया मधे शब्दाचा शेवटी किमान एक अक्षर किंवा अनेक अक्षरं समान असतात.
उदा. १
हरवून, मिसळून, तळपून, तुटून, बरळून, वगैरे.
वरील सर्व शब्द हे न ह्या अक्षराने शेवट होतात..
उदा. २.
पाळल्याने, पाडल्याने, लागल्याने, गोंजारल्याने, ठेवल्याने...
वरील शब्दात ल्याने ही समान अक्षरं आहेत.
*म्हणून हा काफिया शुद्ध काफिया ठरतो*
आता कांचनजींच्या रचनेतला काफिया पाहू. त्यांनी..
माप, मोजमाप, साफ, माफ.
असा घेतला आहे. म्हणजेच ह्या शब्दसमूहाच्या शेवटी एकही अक्षर समान नाही..(प, प, फ, फ असा वेगळा वेगळा आहे) ..
*म्हणून हा काफिया स्वर काफिया ठरतो.*
*अलामत...*
म्हणजे.. काफियाच्या समान अक्षराच्या आधीच्या अक्षराचा स्वर अंत (स्वरांत)...
आपण दोन उदाहरणांचा विचार करू आणि अलामत काय हे समण्याचा प्रयत्न करूया.
*शुद्ध काफिया..*
उदा. १
हरवून, मिसळून, तळपून, तुटून, बरळून,
ह्यामधे समान अक्षर न आहे.. आणि
त्या आधीचे अक्षर.
- हर *वू* न= (व् + ऊ) = स्वर अंत ऊ आहे
- मिस *ळू* न = (ळ् + ऊ) = स्वर अंत ऊ आहे.
- तळ *पू* न = (प् + ऊ) = स्वर अंत ऊ आहे.
- तु *टू* न = (त् + ऊ) = स्वर अंत ऊ आहे.
*म्हणजेच अलामत ऊ आहे.*
उदा. २.
पाळल्याने, पाडल्याने, लागल्याने, गोंजारल्याने, ठेवल्याने...
उदा. २.
पाळल्याने, पाडल्याने, लागल्याने, गोंजारल्याने, ठेवल्याने...
वरील शब्दसमूहात ल्याने ही दोन अक्षरे समान आहेत तर त्या आधीची अक्षरं बदलत आहेत.
- पा *ळ* ल्याने = (ळ् + अ) = स्वर अंत *अ* आहे
- पा *ड* ल्याने = (ड् + अ) = स्वर अंत अ आहे.
- ला *ग* ल्याने = (ग् + अ) = स्वर अंत अ आहे.
- गोंजा *र* ल्याने = (र् + अ) = स्वर अंत अ आहे.
- ठे *व* ल्याने = (व् + अ) = स्वर अंत अ आहे.
*म्हणजे अलामत अ आहे*
*स्वर काफिया*
उदा. ३.
माप, राख, गाव, साफ, माफ, टाक,
ह्या शब्दसमूहात शेवटी एकही अक्षर समान नाही.. म्हणून हा काफिया स्वर काफिया आहे (वर आपण पाहिले)
माप = (प् + अ) .. स्वरांत अ
राख = (ख् + अ)... स्वरांत अ
गाव = (व् + अ).. स्वरांत अ
साफ = (फ् + अ).. स्वरांत अ
माफ = (फ् + अ).. स्वरांत अ
टाक = (क् + अ).. स्वरांत अ
म्हणून अलामत अ आहे, तर शेवटचे अक्षर समान नाही.
उदा.२..
कावा, वाचा, मावा, दाता, स्वाहा..
ह्या शब्द समूहात
अलामत आ असून हा स्वर काफिया ठरतो..
वरील उदाहरणांवरून आपणास.
रदिफ, काफिया (शुद्ध आणि स्वर) तसेच अलामत काय हे कळेल.
गजलेच्या शेरात..
रदिफ = नसला तरी चालतो
काफिया = हवाच. (शक्यतो शुद्धच म्हणजे शब्दाचा शेवट किमान एका तरी समान अक्षराने व्हावा)
अलामत = हवी म्हणजे हवीच
अचूक आणि परिणामकारक अलामत आणि काफिया हे गजलचे सौन्दर्य वाढवतात..
धन्यवाद
No comments:
Post a Comment